Summary of the Book
हि कॉ. अण्णा भाऊंच्या तप्त लेखणीतून उतरलेली एक अजरामर छक्कड आहे. वरवर पाहता प्रेमकथा वाटणारी हि कलाकृती प्रत्यक्षात संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतून जन्माला आलेली पहिली राजकीय छक्कड आहे. महाराष्ट्र संयुक्त झाला पण बेळगाव-कारवार शिवायच. मैनेप्रमाणे देखणे असलेले बेळगाव कर्नाटकातच राहिले. आम्ही आमची मैना म्हणजे बेळगाव महाराष्ट्रात नेणारच अशी असंख्य आश्वासने दिली गेली. पण तरीही बेळगाव महाराष्ट्रात येऊ शकले नाही. आता तर ते बेळगावी होऊन बसला आहे.
तत्कालीन राजकारण, समाजकारण, दंतकथा, कृषिजीवन, अलंकार, संस्कृती या साऱ्या साऱ्यांचं प्रतिबंब या छक्कडमध्ये उमटते म्हणूनच ती सदाहरित आणि कालातीत बनलीय.