Hard Copy Price:
15% OFF R 120R 102
/ $
1.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारतातील 'पाणी' या महत्त्वाच्या प्रश्नावर कार्य करणारा हा शास्त्रज्ञ. पाणी हे जीवन तर आहेच; पण जल ही एक अनमोल संपदा आहे. या जलसंपदेचं नियोजन करण्यासाठी अभ्यास, संशोधन आणि योग्य कृतीची आवश्यकता आहे. "विज्ञानयात्री' मालिकेतील हे पुस्तक डॉ. माधव चितळे यांच्या जलव्यवस्थापनेमधील अभूतपूर्व कार्याविषयी माहिती देणारे आहे.
त्यांचा जन्म यवतमाळचा; पण शालेय शिक्षण झाले चाळीसगावला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते बी.ई. झाले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागात 1956 पासून त्यांनी 28 वर्षे कार्य केले आणि जलसंपदा अभियांत्रिकी या क्षेत्रात मोलाची भर घातली. त्यांच्या हातून पाण्यासंबंधीचे अनेक प्रकल्प यशस्वी रीतीने पूर्ण झाले आणि कार्यात्वयितही झाले. त्यांचे बहुतांशी कार्य महाराष्ट्राच्या जलसमस्यांविषयक होते.
विदर्भासारख्या कोरडया भागात बालपण गेलेल्या या शास्त्रज्ञाने पाण्याचे महत्त्व जाणले. त्यांनी 'जलसंपदा अभियांत्रिकी' या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेली आहे.पानशेतचे धरण फुटल्यानंतर पुण्याला पाणी पुरवण्याचा यक्षप्रश्न असो वा सध्याचा गाजत असणारा मोठी धरणे बांधण्याबाबतचा प्रश्न असो, तो सोडवण्यात डॉ. माधव चितळे यांचे योगदान असतेच.
त्यांचे बहुतांशी कार्य महाराष्ट्राच्या जलसमस्यांविषयक होते. तरीही त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर "जलजागृतीचे' कार्य हिरिरीने केले.या कार्याबद्दल नोबेल पुरस्काराच्या समकक्ष असणारा 'स्टॉकहोम पुरस्कार' मिळवणाऱ्या शास्त्रज्ञाचे हे वाचनीय चरित्र.