Summary of the Book
२००६ मध्ये गोंदवल्यात क्षेत्रगुरुजींनी महाराजांच्या पादुकांवर मला यथाविधी दीक्षा दिली. माझ्या मस्तकावर शाल घातली गेल्यावर पादुका व मी यात संवाद सुरु झाला. महाराजांनी मला स्वीकारलं असल्याचं मला जाणवलं. समाधीकडे पाहिलं आणि म्हणलं," आता तुम्हीच माझे सर्व काही. आई-बाप-भाऊ-हितचिंतक.. मला आता जगात दुसरं कुठलं नातं उरलं नाही. तुम्हाला मी शरण आहे. मला पदरात घ्यावं माझ्यावर कृपा करावी. माझ्या अपराधांची क्षमा करावी"
मी त्या क्षणापासून मागची प्रतिभा/ऋजुता राहिले नाही. मी आता फक्त महाराजांची एवढंच मला नातं राहिलं. मागचे पाश तुटल्यासारखे वाटले. माझा पुनर्जन्म झाला.