Summary of the Book
महाराष्ट्रातील मराठवाडा अनेक वर्षे निजामाच्या अमलाखाली होता. त्यामुळे येथील सामाजिक, राजकीय परिस्थिती वेगळी राहिली आहे. ठेथिल मुख्य भाषा पूर्वी उर्दू होती. मराठीला फारसे महत्व नव्हते. अशा काळात जे मराठी साहित्य या प्रदेशात लिहिले गेले त्याची ओळख नरेंद्र चपळगावकर यांनी 'दीपमाळ'मधून करून दिली आहे. महानुभाव पंथातील, संत एकनाथ, रामदास यांच्या परंपरेतील अनेक संत येथे होऊन गेले. हरिगुणकीर्तन, गीता टीका, संतांच्या चारित्र्याचे वर्णन, तसेच गेय असेलली स्फूट रचना 'पद' हा वाड्मय प्रकार येथे दिसतो. त्याची ओळख, हिंदी भाषक मराठी संत, मध्वमुनीश्वर, अमृतराय, केशवस्वामी, शिवरायस्वामी, दासगणू, मोगलाईतील मराठी अध्यापक, नांदेडचे काव्यपीठ, पहिले ललित मासिक यांसह मराठवाड्यातील संत लेखक, नाटककार, वृत्तपत्रकार, वाड्मय यांची माहिती यातून मिळते.