Summary of the Book
सिद्धहस्त लेखिका महाश्वेतादेवी यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या १५ कथांचा हा संग्रह आहे. वीणा आलासे यांनी या कथांचा अनुवाद केला आहे. 'बियाणं', 'रुदाली' आणि 'बहुला' या तिन्ही कथांमध्ये समाजातील सर्वात खालच्या आर्थिक स्तरावर जगणाऱ्या ग्रामीण जनतेचे शोषण व्यक्त केले आहे.
'मुलभूत मानवाधिकार व भिका मेंढपाळ' ही कथा अत्यंत वेगळ्या धाटणीची आहे. 'मीठ' या कथेत आदिवासींवर होणारे अत्याच्गार दाखवले आहेत. 'द्रौपदी' ही कथा अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. या कथेतील नायिका 'द्रौपदी' ही एक गरीब आदिवासी स्त्री आहे.
तिच्यावरील अन्याय वाचणाऱ्याचा थरकाप होतो. 'तलाक' 'कविपत्नी' आणि 'रॉंग नंबर' या कथा कौटुंबिक जीवनावर आधारलेल्या आहेत.