Summary of the Book
एअर कमांडर रमेश बेनेगल यांनी आझाद हिंद सेनेसमवेत काम केले आहे. 1941 ते 1945 या कालावधीतील थरारक युद्धकथा यामध्ये आहेत. आझाद हिंद फौजेतील सहभागानंतर त्यांना युद्धकैदीही व्हावे लागले. त्यानंतर त्यांना भारतात आणले. काही दिवसांनंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर भारतीय हवाई दलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला त्यांना त्रास झाला. तीन वर्षांनंतर त्यांना संधी मिळाली. 71 च्या भारत-पाक युद्धात त्यांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले. आवर्जून वाचाव्यात अशा या पुस्तकाचा अनुवाद संध्या देवरूखकर यांनी अतिशय सुंदर असा केला आहे.