Summary of the Book
आसाराम लोमटे यांच्या कथा या आजच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामसमाजातील कोसळणीच्या कथा आहेत. त्यांच्या कथांतील दु:खाच्या स्फोटाचे स्वर आपलं अंत:करण घुसळून टाकतात. या दु:खांच्या मिती, रीती आणि त्यांची घनता यांचं जडत्व आपल्याला खिळवून बांधून टाकतं
मानवी समूहांचं खचून जाणं, उखडलं जाणं या खेडयांमधल्या आजच्या भीषण वास्तवाचं अत्यंत भेदक चित्र लोमटे यांच्या कथांमधून उभं राहतं. या कथांचा दीर्घत्वानं, त्यांच्या समूहकेंद्री असण्यानं त्यात भरच पडते. आपल्या भावनिक जडत्वावर प्रहर करणाऱ्या या स्वास्थ्यहारक कथा म्हणूनच फार महत्वाच्या आहेत.
-रंगनाथ पठारे