Summary of the Book
हा काव्यसंग्रह साहित्य आणि समाज या मळलेल्या वाटेकडे फिरकत नाही. समाजमनाशी, त्यातल्या वेदनेशी दुर्दैवाने हा काव्यसंग्रह एकरूप होत नाही. ते हृद्य चित्रण यात येत नाही. पण यात वर येतो,तर येतो, गंगेचा घाटचिरा येतो. यात चंद्र आहे, चांदणी आहे, नक्षत्र आहेत. पाऊस बोलतो, उन हसतं. पाखरं भिरभिरतात, मेघांच्या अंगाखांद्यावर बसतात, ऋतू झुरतात, मित्र होतात.पान-फुलं खुळी होतात पण हे सारं वेगळ्या संदर्भात. रोजच्या ताणतणावातून दूर जात सहज ओघवत्या शैलीत लिहिलेल्या ह्या प्रेमकविता आहेत. वास्तवापासून दूर असल्या तरी त्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. प्रेमाचं आगळंवेगळं दालन खुलं करतात. ह्या दालनातून तुम्हाला काही क्षण तुमचं जग दिसलं, मनात हसलं तर..., ते आणि तेवढचं ह्या कवितेचं यश असेल. यासाठीच हा सगळा लेखनप्रपंच. धन्यवाद.