Hard Copy Price:
25% OFF R 220R 165
/ $
2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपण सर्वच जण लहानपणापासून रामायणातील गोष्टी ऐकत मोठे झालो. आजही कॉमिक्स, पुस्तकं, टीव्ही, चित्रपट या सगळ्या माध्यमांमधून आपण लहान-थोर सगळेच रामकथा बघत, वाचत असतो. फार थोड्यांना माहीत असेल की, भारतातील भाषांमध्ये व वेगवेगळ्या देशांमध्ये मिळून तीनशेच्या वर लहान मोठी रामायणं लिहिली गेली आहेत. बौद्ध, जैन, मुस्लिम रामायणंही आहेत! अर्थात मूळ अधिकृत ग्रंथ महर्षी वाल्मिकी लिखितच.
बर्याचजणांना हे वाचूनही आश्चर्य वाटेल की वाल्मिकी रामायणाप्रमाणेच श्रवणबाळाची कथा वेगळी आहे. जनक राजानं सीतेचं स्वयंवर मांडलंच नव्हतं, रावण अत्यंत विद्वान व धार्मिक शिवभक्त होता आणि कुबेराचा सावत्र भाऊ होता, लक्ष्मणानं "लक्ष्मणरेषा' काढलीच नहती! आणि मुख्य म्हणजे रामायणातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वभाव, गुणदोष, कोणत्या घटनेत कोण कसं आणि का वागलं, विरोधाभास कोणते, या सर्वाचा आपण किती विचार करतो? या पुस्तकात तटस्थ भूमिकेतून, सर्वांबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही सर्व व्यक्ती व घटनांचं सुंदर विश्लेषण केलं आहे. ते वाचून, त्यावर विचार करून आपण केवळ अंधश्रद्धाळू न राहता डोळस आणि सश्रद्ध बनू शकतो. आपल्या संस्कृतीची भागीरथी असं रामचरित्र नव्यानं समजून घेऊ या!