Hard Copy Price:
25% OFF R 500R 375
/ $
4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
पानिपतचं युद्ध ही महाराष्ट्राच्या काळजात गेली अडीचशे वर्ष रुतणारी ऐतिहासिक घटना. आणि या घटनेवरची 'पानिपत' ही विश्वास पाटील यांची गेली अडीचशे महिने लाखो वाचकांच्या हृदयांत घर केलीली ऐतिहासिक कादंबरी.
मुंबई आकाशवाणीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मराठीतील गेल्या ५० वर्षांतील सर्वोत्कृष्ट १० पुस्तकांमध्ये समावेश. ३५ हून अधिक पुरस्कार! 30 वी. सचित्र आवृत्ती. कोल्हापूर येथील प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांनी काढलेली २५ प्रसंगचित्रे व व्यक्तिचित्रांचा समावेश.
नवख्या लेखकाची सुरवातीची उतारी. जवळजवळ पाचशे पानांचा ऐवज वागवणारी ऐतिहासिक कादंबरी.अशा सर्व अशंकांवर या साहित्यकृतीच्या अंगभूत सामर्थ्यस्थळांनी मात केली. कुसुमाग्रज - वसंत कानेटकरांसारख्या दिग्गज साहित्यिकांपासून सामान्य वाचकांपर्यंत सा-यांनी या कादंबरीला प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक पुरस्कार अन् सन्मानांनी 'पानिपत' गौरवली गेली. अन्य भाषांमध्ये अनुवादित झाली. नाट्यरुपाद्वारे रंगमंचावर आली. प्रतिभाशाली कादंबरीकार म्हणून विश्वास पाटील यांचं मानाचं पान शारदेच्या दरबारात मांडलं गेलं.
विश्वास पाटील यांनी लिहिलेले पुस्तक "पानिपत" हे एक उत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी आहे. हे पुस्तक पानिपतच्या लढायांबद्दल माहिती देते आणि मराठी लोकांवर झालेला प्रभाव दाखवते. पुस्तक वाचणे हा एक आनंददायी अनुभव आहे.
sangita raut
31/12/2021
its very touching. thanks to vishwas patil sir.
Ashutosh Bhimrao Nirbhavane
25/08/2021
अतिशय सुंदर कादंबरी आहे. वाचताना अंगावर शहारे येतात. आसे वाटते की आपण प्रत्यक्ष लढाई करत आहे. युद्धाचे जे वर्णन केले आहे ते वाचताना कधी कधी अंगात वीज कडाडून जाते तर कधी रडू सुद्धा येते. अतिशय सुंदर लेखन केले आहे.
Pradnya Pathak
04 Sep 2019 05 30 AM
Ya kadambaritun panipatacha itihas dolyapudhe ubha rahato. Khoop chan likhan ani kuthehi atiranjit vatat nahi. sarvasamanya vachakanparyanta panipatavar kay ghadala he pochavanara ha granth ahe.
Ram
02 Dec 2019 05 30 AM
पानिपत हि कादंबरी audio स्वरूपात उपलब्ध आहे का?
Tukaram Raut
09 Jul 2018 05 30 AM
खुप सुंदर पुस्तक आहे
Shivam Narendra Raut
14/03/2017
आजपर्यंतचं माझ्या वाचनातील सर्वांत आवडीचे आणि माझ्या ग्रंथसंग्रहातील Fabulus साहित्य
वैभव औटी
08 Jul 2016 05 30 AM
पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे पुस्तक
vaibhav raut
03 Aug 2015 05 30 AM
garv ahe mala Marathi aslycha
grav ahe mala ya majy ya etihascha
grav ahe mala Maharashtrian aslycha .
. grav cha nahitar maaj ahe mala Marathi manus aslycha
VISHNU YASHWANT PATIL
20/02/2015
पानिपत होऊन २५०वर्षे उलटली तरी बर्याच लोकांना पानिपत हे म्हणी पूर्तच माहित आहे;परंतु आदरणीय श्री विश्वास पाटील यांची कादंबरी वाचल्यानंतर पानिपत आपल्या डोळ्यासमोर घडतं आहे असे वाटते ! हि कादंबरी प्रत्येकाने आवर्जून वाचावी आणि मराठी माणसाने तर नक्कीच वाचावी! आदरणीय विश्वास पाटील यांच्या लेखनाला तोड नाही, त्यांना माझा मानाचा मुजरा !!!!!
Nikhil Asawadekar
18/02/2015
Get engrossed into History like never before.. Gem of all the historic novels!!
Rajesh Adhe
11 Jan 2014 05 30 AM
best novel
prasad rajendra dahibhate
27/08/2014
Hi
sujata kurhade
08 Oct 2014 05 30 AM
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा.
ANIL JADHAV
25/08/2013
maratha is great warier
mrunal shinde
17/08/2013
it is very useful....for me..
omkar anavkar
25/06/2013
The best novel all over the world
sandeep
24/03/2013
it has touch the heart, thanks to Mr. Viswas Patil ji. Maharashtra always remember this historic event.
anil deshmukh
02 Nov 2013 05 30 AM
yet not read
abhijeet shiinde
02 Feb 2013 05 30 AM
We are very proud on Mr. Vishwas Patil as he has wrote a nice Novel. While reading it has create a live picture of the war. In haryan @ Panipat, my self meet couple up maratha people , they are called as RODEMARATHA as well.
I would like to tell you all that read once this book....
vishal pawar
10 Oct 2012 05 30 AM
खरंच अप्रतिम ।
prakash shinde
14/08/2012
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांच्या घरात असावयास पाहिजे असे पुस्तक.
Avinash
29/06/2012
Hya kadambarila tod Nahi!!!! Excellent & refined work!!!!!!
PRASAD SOMWANSHI
06 Oct 2012 05 30 AM
About Book & Writer: - Simply great novel, no doubt about the study which Mr. Patil has about Panipat war. Excellent writing skill, excellent flow & detail work on small small things about every character.
About History shown in this book: - If Shivaji Maharaj would have predict this kind of future, then i think he would have not fought for having separate kingdom for Maratha's.
Dhaval Nakhwa
13/04/2012
Excellent book! Definitely worth reading.
Nilesh Pawar
12 Sep 2011 05 30 AM
Must Read, Must Have!!!!!!!!!!!!!!!!!
Amazing story of the uncomparable courage and love for the country of the Marathas. The loss of Panipat will always remind us of the people who fought against all the odds against a wicked enemy.
पुंडलिक लाड
31/05/2011
मी प्रथमता विश्वास पाटलांचा खूप आभारी आहे .हे खूप सुंदर पुस्तक आहे पानिपत का म्हणून मराठी मनावर कोरले गेले याचा वेध घेण्यासाठी अवश्य वाचावे असे पुस्तक. अप्रतिम दर्जाचे लेखनशैली असलेले हे पुस्तक जेव्हा मी वाचले त्यावेळेल मी भारावून गेलो पण त्याचवेळी मनाला हाही विचार चाटून गेला कि पेशवे जर हे युद्ध जिंकले असते तर किती बरे झाले असते. विश्वास पाटील ह्यांचे हे पुस्तक जीवनात एकदा तरी वाचावे अशी मी सर्व मराठी बांधवांना विनंती करतो.
shandeo
14/05/2011
मी प्रथमता विश्वास पाटलांचा खूप आभारी आहे... कि त्यांनी हि कादंबरी लिहिली.... पाटीलसाहेब मला अनेक वेळा हा प्रश्न पडला कि? तुम्ही ती लढाई तुमच्या डोळ्यांनी तर पाहिली नाहीना?....... खरच मी तुमच्या पायाशी नत मस्तक आहे........हे तुमचे आसे लिहिणे कसे शक्य आहे....? सांगाल का? आहो ती वाचताना.... म्हणजे ते पुस्तक वाचताना L I V E युद्ध पाहिल्यासारखे वाटते...
sandeep
13/05/2011
मी प्रथमता विश्वास पाटलांचा खूप आभारी आहे... कि त्यांनी हि कादंबरी लिहिली.... पाटीलसाहेब मला अनेक वेळा हा प्रश्न पडला कि? तुम्ही ती लढाई तुमच्या डोळ्यांनी तर पाहिली नाहीना?....... खरच मी तुमच्या पायाशी नत मस्तक आहे........हे तुमचे आसे लिहिणे कसे शक्य आहे....? सांगाल का? आहो ती वाचताना.... म्हणजे ते पुस्तक वाचताना L I V E युद्ध पाहिल्यासारखे वाटते...
PRAPHULL दळवी
05 Sep 2011 05 30 AM
आती सुंदर
हेमंत गोळे
05 Mar 2011 05 30 AM
मी हि कादंबरी ५ वेळा वाचली आहे.. पण अजून त्यामधील गुड रहस्य उलगडतात, जेव्हा मी परत ती वाचण्यास गेतो तेव्हा... १ अजरामर अशी वाहती गंगा.. धन्यवाद
हृषीकेश बळीराम मुलीक
03 Dec 2011 05 30 AM
पानिपत हि विश्वास पाटलांची एक अजरामर व संस्मर्नीय अशी ऐतिहासी कादंबरी आहे.
तुषार घारगे
03 Apr 2011 05 30 AM
एकच नंबर भाऊ पटकन विकत घ्या आणि अनुभवा मराठी
थरार जस्ट गो फोर इट
om
26/02/2011
बोले तो जबरदस्त बाप
मयुरेश kulkarni
25/02/2011
खूप सुंदर पुस्तक आहे.मराठी माणसाचा पराक्रम वाचून मन आनंदाने भरून आले.हे पुस्तक प्रत्येक मराठी घरात असायलाच पाहिजे. नाद खुळा,काटा किर्र.
"गर्व आहे मला मी मराठी असल्याचा."
.
विवेक varpe
25/02/2011
एक नुम्बेर books
प्रफुल शिरसाठ
24/02/2011
खूप सुंदर
dheeraj kadav
20/02/2011
mala pustak khup aavdal
अमेय गोडे
20/02/2011
खरच हे पुस्तक वाचताना एका वेळी मराठी माणसांच्या पराक्रम ऐकून छाती फुगून येते आणि दुसर्याच क्षणी मराठी माणसांचा लाचारीपणा, गद्दारी, एकमेकांना खाली पाडण्याची चढाओढ बघून फार दु:ख वाटते. हे पुस्तक बेचैन करते, रडायला लावते... विश्वास पाटीलांचे शतशः आभार...
शंकर पाटील
02 Nov 2011 05 30 AM
खरतर "पानिपत" लिहिल्या बद्दल विश्वास पाटीलांचे महाराष्ट्राने आभार मानायला हवेत. अप्रतिम वर्णन, इतिहासाचे सचित्र दर्शन त्यांनी डोळ्यासमोर उभे केले आहे.
विश्वासराव बोलिज पाटील
02 Jul 2011 05 30 AM
very very very best and touching उत्कृष्ट अप्रतिम अवश्य वाचावे पानिपाताला ३०० वर्ष पूर्ण होतयात या १४ जानेवारीला चला पुन्हा एकदा आपला शौर्याचा वीरश्रीचा इतिहास अनुभवूया
Yashvant
02 Apr 2011 05 30 AM
very very very very very very very best and touching
ganesh katkar
02 Jan 2011 05 30 AM
khup changali kadambari ahe
प्रवीण
30/01/2011
patil
Pritam PAshte
29/01/2011
उत्कृष्ट.
पियुष जाधव
28/01/2011
पानिपत का म्हणून मराठी मनावर कोरले गेले याचा वेध
घेण्यासाठी अवश्य वाचावे असे पुस्तक.
Suraj Kshirsagar
24/01/2011
उत्कृष्ट अप्रतिम अवश्य वाचावे
Shrikant Dhumal
19/01/2011
एकदा तरी वाचावे असे पुस्तक
वकील उमा भोसले
18/01/2011
मला प्रचंड आवडलेले पुस्तक .....
amol kalaskar
14/01/2011
navin pidhila jar marathyancha itihas shikaycha aasel tar panipat vachya shivay paryay nahi.
संदीप देवरचेट्टी
14/01/2011
विनाकारण फाफट पसारा बरोबर असला आणि ऐन वेळी भरोशाच्या लोकांनी साथ दिली नाही तर अंतिम ध्येय कसे साध्य होत नाही याचे पानिपत म्हणजे एक डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे. दुर्दैवाने आपण त्यातून फारसे काही शिकलो नाही अजून! बाकीच्या गोतावळ्याने तीर्थयात्रे मध्ये एवढा वेळ घालवला नसता, सदाशिव रावांना वेळच्या वेळी आर्थिक मदत मिळाली असती आणि शिंदे आणि होळकरांनी विश्वासराव पडल्यावर पळ काढला नसता तर आज मराठ्यांचा इतिहास काही वेगळाच असता.
मनीष ढेरे
14/01/2011
आज पािनपतला 250 वर्ष पूर्ण झाले आहे. खरा अर्थाने तो मराठ्न्चा िवजय होता. १४ जानेवारी १७६१ साली आजचा िदवसी
या युद्धाची सुरवात झाली होती.
मोहन काळे
01 Aug 2011 05 30 AM
हे पुस्तक मी सान होजे कॅलिफोर्निया येथे असताना तेथील किंग्स लायब्ररीला आणण्यासाठी विनंती केली होती. नितीन देसाई ह्यांनी शिवाजी महाराजांवरील चित्रपटानंतर पानिपत ह्या पुस्तकावर आधारित चित्रपट इंग्रजी,हिंदी आणि मराठीत काढावा.तसेच विश्वास पाटील ह्यांनी राणी लक्ष्मिबयिवर एक पुस्तक लिहावे.म्हणजे त्या राणीला न्याय मिळेल.
yashodhan
01 Jul 2011 05 30 AM
पानिपाताला ३०० वर्ष पूर्ण होतयात या १४ जानेवारीला चला पुन्हा एकदा आपला इतिहास अनुभवूया पण तो पराभवाचा नव्हे तर शौर्याचा वीरश्रीचा
गुरुप्रसाद
01 Jul 2011 05 30 AM
`ऐतिहासिक' असूनही `वर्तमानकालीन' वाटावे असे ह्या पुस्तकातील लेखन आहे . ह्या पुस्तकावर एखाद्या हॉलीवूड दिग्दर्शकाने चित्रपट काढावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
ज्यामुळे सर्व जग हा अनुभव घेईल.
Amol Patkhedkar
01 Jun 2011 05 30 AM
अप्रतिम दर्जाचे लेखनशैली असलेले हे पुस्तक जेव्हा मी वाचले त्यावेळेल मी भारावून गेलो पण त्याचवेळी मनाला हाही विचार चाटून गेला कि पेशवे जर हे युद्ध जिंकले असते तर किती बरे झाले असते. विश्वास पाटील ह्यांचे हे पुस्तक जीवनात एकदा तरी वाचावे अशी मी सर्व मराठी बांधवांना विनंती करतो.
मधुसूदन
01 Apr 2011 05 30 AM
हे पुस्तक मी सहा वेळा वाचले आणि सहाही वेळा रडलो आहे. वाचताना आपण भावूंच्या सैन्यातील एक शिपाई आहोत आणि पानिपातावाराच्या मैदानावर उभे आहोत असेच वाटते. मराठ्यांनी प्राणपणान लढलेल्या उद्याचे अप्रतिम वर्णन या पुस्तकात आहे. मंत्रावेग्ला अशीच एक कादंबरी मी वाचली आहे. त्यातला एक प्रसंग आठवतो.
दुसरे बाजीराव पेशवे एका मैदानात उभे असतात. एक मुलगा वडिलांना पाठीवर घेवून जात असतो वडलांच एक हात तुटलेला असतो. वडील जयाल तयार नसतात. पेशवे ते ऐकतात आणि त्यना विचारतात 'तुम्हाला का जायचे नाही?' ते म्हणतात 'पानिपतावर हा हात कापला गनिमान. पण हात कापण्या आधी सहा गर्दी कापला होते. धनी मेलो तरी हरकत नाही पण पळून जाणार नाही.'
पानिपतचे युद्ध हे मराठी दौलतीच्या काळजावर काळाने केलेला क्रूर आघात होता ज्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली.