Summary of the Book
भारतात हळूहळू स्वान्त्र्ययुध्द पेटू लागले. होते त्याच वेळी उच्च शिक्षणाचे वारेही वाढू लागले होते. उच्चशिक्षण घेणारी आपली पहिली पिढी जागृत झाली होती. पाश्चात्य व पौरात्य संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करू लागली होती. मनात परिवर्तनाच्या बिया रुजवत होती. २४ जाने. १८५७ ला कलकत्ता विद्यापीठ १८ जुन. १८५७ ला मुंबई विद्यापीठ स्थापन झाले. १८५९ मध्ये मुंबई विद्यापीठाची पहिली मॅट्रिक परीक्षा तर २८/४ /१८६२ मध्ये मुंबई विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ हे सारं भारताच्या विकासातलं तसं प्रागतिक पाऊल होतं. यांकडे सर्वांचे लक्ष गेलं.
अनेकविध नव्या सुधारणा झेलत भारतीय माणूस विकसित होत होता. त्यातील काही माणसाच्या लक्षात स्त्रियांची परवशता आली अन त्यांची परिवर्तनाची पावले या दिशेने वळली. असे स्त्री शिक्षणाचे एक ऐतिहासिक पर्व गोपाळराव जोशी पासून म्हणजे आनंदीपासून, म्हणजे यमुपासून सुरु होते. तिच्या जडणघडणीचा, सुख- दुःखाचं गणित मांडणारा आलेख, समजून घ्यायचा असेल तर तिच्या जीवनप्रवासाचे दर्शन घेणेच योग्य होईल.