चारधाम यात्रा म्हणजे यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ यात्रा करण्याची इच्छा अनेकांना असते. ही यात्रा कठीण आहे. चालणे भरपूर आहे, अशी समजूत असते. ती काही अंशी खारी असली, तरी व्यवस्थित नियोजन केले, तर ती सुरळीत पर पाडते, हा अनुभव डॉ. मनोहर सालफळे यांनी 'हिमालयातील स्वर्गारोहण' या पुस्तकातून केलेल्या मार्गदर्शनाने येतो. हिमालय पर्वतरांग ही जगातील महत्त्वाच्या पर्वतांपैकी एक. हिमालयाच्या कुशीतील या धर्मस्थळांचे दर्शन घेण्याबरोबरच तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, समाजजीवन अनुभवणे हा प्रवासातील उद्देश कसा सफल होतो, याचे अनुभवकथन यात केले आहे. प्रवासाची सुरुवात हरिद्वारपासून होते. तेथून यमुनोत्रीचे दर्शन घेतानाचा अनुभव, निसर्गाचे बदलते रूप, गंगोत्री व परिसरातील स्थळांचे दर्शन, टिहरी, रुद्रप्रयाग, उत्तराखंडमधील श्रीनगर, केदारनाथ व बद्रिनाथाचे माहात्म्य, तेथील प्रवासाचे वर्णन लेखकाने केले आहे. मात्र, याचबरोबर घरातून निघाल्यापासून प्रवासात कसे जावे, अंतर, राहण्याची व्यवस्था, स्थलदर्शन, प्रवासाचे पर्याय, खर्चाचा अंदाज, हेही सांगितले आहे.
‘हिमालयातील स्वर्गारोहण’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5171209279646635540