Summary of the Book
प्रामुख्याने `स्त्री’ केंद्री असलेल्या या कवितांत बालपणीच्या आठवणी व त्या काळात जडलेले दृढ भावबंध अनुभवत कवयित्रीने स्वतःचा प्रौढपणाकडे झालेला प्रवास उत्कटपणे रेखाटला आहे.
पुरुषाशी असलेल्या स्त्रीच्या नात्याचा-एकूण मानवी नातेसंबंधांचाच गंभीरपणे शोध घेतला जातो. हा समग्र अनुभव सहज शैलीत व नव्या प्रतिमांत व्यक्त झाल्यामुळे या कवितेला पृथगात्मता प्राप्त होते.
या शोधाच्या वेगवेगळ्या दिशा आहेत. त्यामागे अंतर्मुख, चिंतनशील वृत्ती आहे. ती वृत्ती हे `सांगी’चे महत्त्वाचे वैशिष्टय आहे.
`कधीतरी ब्रह्मकमळ फुलणारच आहे! कधीतरी उषःकाल होणारच आहे!’ हा सकारात्मक सूर कवितेला एक व्यापक परिमाण देतो; आणि रसिकाच्या मनात सहजपणे रुजणारी ही स्वतंत्र चेहर्याची कविता तिच्या भावी प्रवासाच्या आश्र्वासक पाऊलखुणाही तेथे उमटविते.
एकूण मराठी कवितेला एक नवा अवकाश देणारी अशी ही गुणवंत कविता आहे.