Summary of the Book
ज्या समाजाचे सार्वजनिक जीवन समृद्ध नाही, तो समाज आधुनिक आणि पुरोगामी आहे, असे कसे म्हणता येईल? अशा १२५ कोटी भारतीयांच्या समृद्ध सार्वजनिक जीवनाकडे जाणारा रस्ता आज नेमका कशामुळे अडला आहे? आजच्या सर्वव्यापी नकारात्मकतेला भारतीय समाजाची वृत्ती जबाबदार आहे, की व्यवस्था?
शुद्ध हवा, पाणी आणि रक्ताला मानवी जीवनात जे महत्व आहे, तेच महत्व आज पैशाला आले आहे. पण अशुद्ध पैशाने मानवी जीवनात जणू विष पेरले आहे. देशाच्या शरीरातील हे विष काढण्याचे एक ऑपरेशन म्हणजेच ही प्रश्नोत्तरांच्या रूपाने केलेली ठोस उत्तराची मांडणी...