Summary of the Book
आजीव पुरुषोत्तम पटेल यांची लोकनाथ हि कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. विजयनगरच्या सत्ताधीशांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची मूर्ती उचलून नेऊन तेथील भव्य मंदिरात बंद केली. तेथून विठ्ठलाची मूर्ती परत आणून तिची पुनर्स्थापना करण्याच्या घटनेचा वेध यात घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील थोर संत परंपरेतील श्री भानुदास, श्री जनार्दन स्वामी, श्री दामोदिगम्बर, आणि प्रकाशक यात्री संत श्री एकनाथ हे चारही महानुभाव संत या कादंबरीतील प्रमुख पात्र आहेत. त्यांच्या भूमीत वास करून आणि त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून लेखकाने ही कादंबरी लिहिली आहे. 'एकोबा ! तुम्ही आता नाथ महाराज झालात ! तुम्हीच तुमच्या चरित्राने लोकनाथ झालेलें आहात !' हे संत ज्ञानेश्वरांचे उद्गार या कादंबरीचा आत्मा आहेत.