Summary of the Book
आपण अनेक गोष्टी पाहत असतो; शिकत, वाचत असतो. काहींबद्धल आपल्याला उत्सुकता असते, श्रद्धा असते. त्याबद्धल जाणून घेण्याची ईच्छा असते. अशा काही महत्वाच्या आणि अनेकांच्या औतसुक्याच्या विषयांवर नरहर कुरुंदकर यांनी 'यात्रा' मधून विचारमंथन केले आहे. भारताचे महाकाव्य समजले जाणारे महाभारत हे किती जुने आहे, त्याची ऐतिहासिकता, ते घडले कि नाही यावर भिक्षु उत्तमबोधी यांच्या लेखावर विचार आहेत.
तसेच शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. ग. श्री. खैर यांनी श्रीमद् भगवद्गीतेवर केलेले संशोधन, शिक्षण व संस्कृती, साहित्य परिषदेविषयी विवेचन, आचार्य रजनीश यांचे संभोगातून समाधीकडे जाणारा प्रयोग, बुवाबाजी आणि समाज, कीर्तन परंपरा, वर्णव्यवस्था ईश्वरप्रणीत आहे... आदी १६ विषयांवर परखड विचार मांडले आहेत. यातून संबंधित विषयांवर नव्याने प्रकाश पडला असून. वेगळे पैलू पुढे आले आहेत.