Summary of the Book
"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या "विचारांच्या सावल्या' या लेखमालेचे हे पुस्तकरूप आहे. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी बी. जी. वाघ यांनी ही मालिका लिहिली आहे. यात 52 विषय आहेत. सॉक्रेटिसपासून बर्ट्रांड रसेलपर्यंतच्या अनेक विचारवंतांच्या या विचारांच्या सावल्या आहेत. लेखकानं याबाबत म्हटलंय, की सत्य जाणण्यासाठी मुक्त मनाची आवश्यकता असते. बहुविध चिंतन पद्धतींचा, परस्परविरोधी विचारांचा, धर्ममतांचा आदर करावा लागतो. धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा विकास त्यातूनच होत असतो. अर्थात, विज्ञानाची प्रेरणा ऐहिक असते, तर धर्माची पारलौकिक. त्यामुळेच काही संघर्ष अटळ असतात. मात्र, हेही तितकेच खरे, की धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान व त्यामागील अध्यात्म जेव्हा एकाच पातळीवर येतील आणि अधिक उन्नत होतील, तेव्हाच मानवजात खऱ्या अर्थाने मुक्त होईल.