Summary of the Book
सर्वश्री मिरासदार, शंकर पाटील, बोराडे आणि आनंद यादव यांनी आपल्या विनोदी कथांमध्ये खास अशा ग्रामीण माती, ग्रामीण संस्कृती आणि मनोवृत्ती यांच्या अस्सल विनोदी गंधाने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या प्रा. द. ता. भोसले यांच्या विनोदी कथांनी स्वतंत्र स्थान संपादन केले आहे. विपरीत परिस्थितीतून निर्माण झालेला, विचित्र पेचप्रसंगातून साकार झालेला, निखळ उपहासगर्भ व व्यंगात्म स्वरूप लाभलेला अन् भाबड्या, बेरकी माणसांच्या वागण्या - बोलण्यातून जन्मलेला प्रसन्न आणि निकोप विनोद हे त्यांच्या विनोदी कथांचे बलस्थान आहे. व्यक्ती, परिस्थिती आणि प्रसंग यांनी एकरुपात्म झालेला त्यांचा विनोद आपणास आनंद देतोच, पण मानवी जीवनाचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शनही घडवितो. म्हणूनच सध्या त्यांच्या या संग्रहातल्या कथा दूरदर्शनच्या तीन मराठी वाहिन्यांनी आपल्या मालिकांसाठी स्वीकारलेल्या असाव्यात.