Summary of the Book
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव जरी उच्चारले, तरी चैतन्याचा संचार झाल्यासारखे वाटते. त्याच सावरकरांच्या लेखणीतून हे पुस्तक साकारले आहे. स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतविण्याचे काम या ग्रंथाने स्वातंत्र्यपूर्व काळात केले होते. ज्वालामुखी, स्फोट, अग्निकल्लोळ आणि तात्पुरती शांतता या चार भागांत हे पुस्तक विभागले आहे.
स्वधर्म आणि स्वराज्यापासून पहिल्या भागाची सुरवात होते. दुसऱ्या भागात शहीद मंगल पांडे, आयोध्या प्रांतातील रण आदींचा समावेश होतो. तिसऱ्या भागात तात्या टोपे, लक्ष्मीराणी या व्यक्तीमत्वांचा मागोवा घेतला आहे; तर पूर्णाहुती आणि समारोपाने पुस्तकाची सांगता होते. सावरकरांनी लिहिलेल्या शब्दांच्या या तेजशलाका सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमराचा पूर्ण अनुभव देतात.
ओंकार हिरवे
07 Jan 2012 05 30 AM
१८५७ च्या उठावाची खरी करणे सांगणारा अजरामर ग्रंथ
शुभम राजपूत
04 Dec 2012 05 30 AM
हे पुस्तक एक खरे इतिहास सांगणारे आहे.आताच्या इतिहासाच्या पुस्तकातील खूप चुका निघतील असे हे पुस्तक आहे.
swapnil asabe
03 Oct 2012 05 30 AM
I like this book very much. Jai Hind.
उपेंद्र फडके
06 Mar 2011 05 30 AM
अतिशय सुंदर पुस्तक....सावरकरांचे शब्द म्हणजे त्याला तोडच नसतो...
चुकीच्या पद्धतीने शिकविलेला इतिहास सुधारण्याची संधी देणारे पुस्तक.
प्रसाद गुळवणी
03 Aug 2011 05 30 AM
प्रत्येक भारतीयाने जरूर वाचावे.
निलेश गायधनी
02 Nov 2011 05 30 AM
वा फारच सुंदर कल्पना आहे.
वकील उमा भोसले
18/01/2011
मला हे पुस्तक खूप शोध करून सुद्धा वाचायला मिळाले नाही
सावरकरांचे अप्रतिम पुस्तक आगदीच वाचायचे आहे .....आहे
मोहन काळे
01 Aug 2011 05 30 AM
चांगल्या आणि प्रखर देशभक्ताने लिहिलेले हे पुस्तक खूपच
छान आहे.प्रवीण पाटील ह्यासी:हे पुस्तक ग्राहक पेठ एस पी कॉलेज समोर येथे चोकशी केल्यास उपलब्ध होऊ शकते.
I want this book. How can i get this book?
१८५७ चा खरा इतिहास जो मागची दीडशे वर्षे दडवून ठेवला गेला
One of the Best book , I ever read,,,,