Summary of the Book
स्वतंत्र भारताने संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारली. यामुळे देशात अनेक चांगले बदल घडून आले. मात्र, तरीही आज बहुतेक समाज घटकांमध्ये असंतोष आहे. याला राजकीय नेते, पक्ष जबाबदार असले; तरीही आपण सर्व भारतीय नागरिकदेखील जबाबदार आहोत. लोकशाहीने आपल्याला अधिकार दिले. मात्र त्याबरोबर येणारी जबाबदारी पेलण्यास भारतीय समर्थ होते का, याचा विचार आता होत आहे. देशात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यास समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी 'आहे 'लोकतंत्र' तरीही'मधून केला आहे. लोकांना आता नुसती लोकशाही नको आहे, असे लेखक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाबाबत लिहिताना म्हणतात. जनमानसाची विचारसरणी बदलण्यासाठी त्यांनी विविध मुद्यांचा आढावा घेतला आहे. त्याचे परिणाम दिले आहेत व काय करायला हवे, याचे मार्गदर्शन केले आहे.