Summary of the Book
१९ जून १९६६ रोजी मराठी अस्मिततेची ठिणगी पडली आणि महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय क्रांतीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. या क्रांतीच्या पर्वात शिवसेनेने मराठी समाजाला, महाराष्ट्राला अभिमानाने जगायला शिकवले. 'गर्व से कहो हम हिंदू है' असे हिंदूंना उच्चारण्याची शक्ती आहे.
गेल्या ५० वर्षात शिवसेनेचे अनेक धक्के पचवले, निवडणुकीतील यश - अपयश अनुभवले. पण ती कधीही खचली नाही. पुन्हा जोशाने उभी राहिली. याच ५० वर्षात देशात ८० हुन अधिक 'सेना' उदयाला आल्या आणि अस्तही झाल्या. पण टिकून राहिली ती फक्त शिवसेनाच.
आज महाराष्ट्रात आक्रमकपणे काम करणारा शक्तिशाली राजकीय पक्ष अशीच शिवसेनेची ओळख आहे. समाजहितासाठीच्या आक्रमक भूमिकांमुळेच शिवसेना पक्ष महाराष्ट्रातील तरुण, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि मध्यवर्गीयांचा आधारवड बनला आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेचे स्वबळावर सरकार येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणार आहे. शिवशाही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात अवतरणार आहे. त्या दिशेने शिवशाहीची आता जोरदार वाटचाल सुरू आहे.