Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
250
/ $
3.21
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पानिपतचा इतिहास हा पराजयाचा आहे, असं म्हंटलं जातं. मात्र प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकात पानिपतचा विजय वर्णिला आहे. जाधव यांनी पुस्तकाची सुरुवात पानिपत गावाच्या इतिहासापासून केली आहे. अब्दाली, अब्दालीची स्वारी, कुंभेरची लढाई, दिल्लीची गादी, अटकेपार दांडे, दत्ताजी शिंदे, बुरांडी घाटाची नाकेबंदी, बंडाची लाट, दिल्लीवर हल्ला, पहिला विजय, अखेरचा रणसंग्राम, होळकर, इब्राहीम खान, हताश अब्दाली अशा क्रमाने इतिहास पुढे सरकत रहातो.
पानिपतच्या युद्धात जसं मराठ्यांचं नुकसान झालं, तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर अब्दालीचही झालं, असे लेखक सांगतात. या युद्धात मराठ्यांना मागे फिरावे लागले, तरी हा निर्णय दूरगामी दृष्टीने योग्य ठरला. असं सांगून त्याचं विस्तृत स्पष्टीकरणही त्यांनी पुस्तकातून केलं आहे. या युद्धात जसे मराठ्यांचे नुकसान झाले तसेच मोठ्या प्रमाणावर अब्दालीचेही झाले. विजय म्हणावा तसा अब्दालीला या युद्धातून ना पैसा मिळाला, ना मुलुख, ना एखादी सत्ता. मग विजय तो कसला आणि कशाचा? या युद्धातून मराठ्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागल्याचे क्षणिक चित्र दिसते तर दुरगामी दृष्टिकोनातून पाहिले तर मोठा दीर्घकालीन निर्णायक विजय मराठ्यांनी या युद्धात नोंदवला.
या युद्धानंतर ३५ वर्षे दिल्लीवर भगवा फडकला. मराठ्यांचा या पार्थ पराक्रमामुळे पंजाबातील शिखांनाही परकीय आक्रामकांविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळाली. स्वातंत्र्यासाठी अनेक दशके लढणाऱ्या शिखांच्या स्वातंत्र्याची पायरी मराठ्यांनी बसविली हे विसरून कसे चालेल. अब्दाली स्वतःच्या अटीवर नव्हे तर मराठ्यांना हवा तसा तह करून या प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू इच्छित होता ते याच कारणामुळे. मराठ्यांनी अब्दालीला दिलेला तडाखा एवढा जबरदस्त होता की खुद्द अफगाणिस्थानात अब्दाली जिवंत राहील का? असा प्रश्न लोकांना पडला. कांदाहारात अनेक प्रकारच्या बातम्या पसरू लागल्या. त्यात अब्दालीचा दारूण पराभव झाल्याची बातमी सराव मोठी होती.
आता हिंदुस्थानात तर काही मिळाले नव्हते. आणी तिकडे दोन वर्षे अब्दाली भारतातच अडकल्यामुळे त्याच्या प्रभावाची बातमी तिकडे पोहोचल्यामुळे तिथले तख्तही बुडण्याच्या भीतीने अब्दालीला पाळणे भागच होते, तो जिवंत राहिला होता हेच त्याचे नशीब आणि हाही इतिहास जाणून होता की सिकंदर सारख्या जगजेत्याला हिंदुस्थानातील लोकांनी तांगडून मारला होता आणि बेबीलोनला तो जिवंत पोहचू दिला नव्हता. आपलाही मराठे सिकंदर करतील या भीतीने गाळण उडालेल्या अब्दालीने असेल तशा परिस्थितीत मोकळ्या हातांनी खिन्नावस्थेत हिंदुस्थान सोडला.
पानिपतच्या युद्धावर लिहिलेलं हे छोटेखानी पुस्तक म्हणजे वस्तुनिष्ठ ऐतिहासिक ग्रंथ नसून एक प्रश्नमालिका आहे, पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेलेल्या इतिहासासाठी. यास्तव मी फक्त इतकेच म्हणेन कि हे पुस्तक वाचण्याआधी आपण शेजवलकर यांचं 'पानिपत 1761' आणि संजय क्षीरसागर यांचं 'पानिपत असे घडले' हि ऐतिहासिक संदर्भांना धरून लिहिलेली पुस्तके वाचावीत आणि मग हे पुस्तक वाचावे आणि त्यामधील प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधावीत.
prashant
23/11/2013
like
Akhil.v.joshi
26/11/2011
first know the history through wikipedia then read this book. It will be a great source of information.