Summary of the Book
१९५५ ते १९८५ च्या कालखंडात मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर अनेक महत्त्वची नाटकं आली. त्यातील काही व्यक्तिरेखांनी नाटयप्रेमींच्या मनावर खोलवर ठसा उमटवला. लखोबा- प्रभाकर पणशीकर (तो मी नव्हेच) आप्पासाहेब- श्रीराम लागू (नटसम्राट) बापू- काशिनाथ घाणेकर (गारंबीचा बापू) नाना- मोहन आगाशे (घाशीराम कोतवल) गुलाबराव- नाना पाटेकर (पुरुष) मंजुळा- भक्ती बर्वे (ती फुलराणी) भीष्म- मा. दत्ताराम (मत्स्यगंधा) सखाराम- निळू फुले (सखाराम बाईंडर) नानी- विजया मेहता (संध्याछाया) या आणि अशा इतर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका...ती नाटकं... त्यांना आनुषंगिक असणार्या अनेक गोष्टी बारकाव्यांसह नाटयप्रेमींच्या नजरेसमोर याव्यात, त्यातील प्रभावी-अर्थवाही संवाद कानात गुंजावे, त्यातील प्रसंग जिवंत होऊन नव्याने त्यांचा नाटयानुभव मिळावा या हेतूनंच प्रस्तुत पुस्तकात एकूण २१ गाजलेल्या रंगभूमिकांचा परामर्श घेतला आहे तो काळ, ते नाटक, ती भूमिका पुन्हा जगण्यासाठी, कालच्या पिढीला पुन:प्रत्ययाचा आनंद मिळण्यासाठी आणि नव्या पिढीला नव्याने अनुभूती मिळण्यासाठी हा रंगप्रपंच...