Summary of the Book
‘‘‘मी, अचला, तुला एक सांगतो :
यशस्वी लग्न ... सुखी संसार इज् ए मिथ् ! अस्तित्वात नसलेली ती गोष्ट आहे. नवऱ्याची, बायकोची मनं, त्यांची प्रकृती, विकृती... या सगळ्यांमध्ये जुळण्यासारखं काही असतं का ?
ज्यांचे संसार सुखाचे दिसतात, ते सुखाचं गिलीट चढवलेले दागिने असतात ! खोट्या दागिन्यांचं गिलीट काळं पडू नये, म्हणून आपण जपतो ना ? तसं लग्नाचं गिलीट जाऊ नये, म्हणून जपावं लागतं. मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. मला अनेकदा वाटतं, सत्यभामेचं अंतर्मन आपल्याला कळायला हवं ! कृष्णाबद्दल तिला खरंखुरं काय वाटत होतं ? कारण शेवटी बायको ती बायको ; आणि मैत्रीण ती मैत्रीण ! नवरा तो नवरा; आणि मित्र तो मित्र !’’