Summary of the Book
भारतीय शास्त्रज्ञ वाचस्पती यांना अचानक मिळालेल्या एका गुढ संदेशाने वादळ उडवून दिले होते. तो संदेश धाडता धाडता परग्रहावरील यान झपाट्याने पृथ्वीच्या रोखाने येत होते. तो संकटाचा इशारा होता की देवाचा आशीर्वाद होता? जगातल्या दोन महासात्तांचे श्रेष्ठ वैज्ञानिक त्याचा अर्थ लावण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. आणि त्यातूनच संघर्ष निर्माण झाला की सत्यशोधनाच आग्रह धरणार्या वैज्ञानिक बुद्धीची कास धरायची की आद्ण्यानाच्या भीतीला शरण जाऊन सावधगिरीचे उपाय योजायचे?
परग्रहावरील अतिप्रसंग संस्कृतीशी साधला जाणारा माणसाचा हा पहिला संपर्क होता. पृथ्वीवरही या घटनेचे परिणाम सर्व क्षेत्रांत क्रांतिकारक ठरण्याची शक्यता होती. म्हणजे प्रश्न केवळ वैज्ञानिक संशोधनाचा, निरीक्षणाचा नव्हता. या यानाचे स्वागत कसे करायचे हा, पृथ्वीवरील अखिल मानवजातीच्या वतीने घ्यावयाचा एक सामाजिक-राजकीय निर्णय होता....
पारितोषिक विजेते विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे आणि मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील व्याख्याते चिंतामणी देशमुख यांनी मिळून लिहिलेली, मराठी साहित्यात आगळीवेगळी ठरेल अशी वैज्ञानिक कादंबरी.