Summary of the Book
लहान आशयातून जीवनातील महत्वाच्या गोष्टींकडे कथा लक्ष वेधून घेतात. हा लेखन प्रकार सोपा वाटत असला तरी तो अचूक, समर्थ शब्दांत उतरविणे कठीण असते. गो. वि. कुलकर्णी यांना या गोष्टी जमल्याने 'प्रत्यय कथा' मधील त्यांच्या कथा जीवनातील अनुभव कथन करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. कल्पनाविश्वात रमलेल्या कथांमधून वास्तवातही असे असू शकते, याची जाणीव होते. पिळा, शेकोटी या कथांमधून जीवनात प्रेम, भावनेचे महत्व पटवून देतात. वारस, तिरडी या कथांमधून मनुष्यातील सुप्त वृतींचे दर्शन देतात. यातील सर्व कथा आधुनिक व वास्तवाला धरून असल्याने वाचक त्याच्याशी एकरूप होतो. तसेच प्रत्येक कथा ही वेगळ्या पार्श्वभूमीवरील असल्याने त्यांचे स्वतंत्र अस्तित्व जाणवते.