Summary of the Book
दुष्काळामुळे पाणी संकट, दुष्काळात अन्नधान तुटवडा, दुष्काळामुळे स्थलांतर, दुष्काळ म्हणून बेकारी, उपासमार, टंचाई... मग तो तुटवडा विजेचा असो, चारा-पाण्याचा असो किंवा कामधंद्याचा. अशा टंचाईचा गाजावाजा करणे, आपला हतबलतेचे प्रदर्शन घडवून मदतीची आशा बाळगून आशाळभूतप्रमाणे हातावर हात ठेवून महिनोन्महिने चिमूटभर निधीचा चिंधीसाठी चिमणीएवढे बारीक तोंड करून वाट पाहण्यात आम्हाला धन्यता वाटते. नेमके हेच आमच्या अधोगतीचे कारण आहे आणि तेच आम्हाला समजत नाही, म्हणून आम्ही मदतीची आस धरतो. पुनर्वसनाची वाट पाहतो. वाट पाहून थकतो तेव्हा यंत्रणेच्या नावाने खडे फोडत बसतो. अशी ही आहे आमच्या दुर्बल, हतबलतेची कर्मकहाणी. दुष्काळाचे संकट फार मोठे संकट नाही. तेसुद्धा इतर संकटांसारखेच आहे. त्याचेसुद्धा निर्मूलन करता येते याचे प्रत्यंतर प्रत्येक आपत्तीग्रस्ताला यावे म्हणून हा ‘बळ’ लिहिणाचा खटाटोप आहे.