Summary of the Book
"कधी कधी वाटतं ...
दिदीसारख्या कलाकारांचा जीवनपट
भावनिक चढउतरांतून मांडला जावा.
सन तारखांचे बिंदू जोडून तयार झालेल्या चित्राला
चरित्राचा आत्मा कसा लाभणार?
त्यात गणिती सत्यता असेलही,
पण मनातले कल्लोळ कसे उमटणार?
कलाकार घटनांनी निर्माण होत नाही, सिद्ध होतो.
घटना, परिस्थितीचे आघात
ही जमिनीखालच्या झऱ्याच 'घडणं' मात्र न सुटणारं कोडं असतं.
तो आकलनाच्या बाहेरचा चमत्कार असतो.
आम्ही भावंड एकाच वेळी एकाच परिस्थितीतून जात होतो.
सर्वच जण मास्टर दीनानाथांची मुलं होतो.
पण 'लता मंगेशकर' मात्र एकच घडली."