Summary of the Book
संबंध जगभरामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार अत्यंत वेगाने झाला आहे. अनेक देशांनी हे नावे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा झालेला आविष्कार पाहून सरकारी यंत्रणेनेही या तंत्रज्ञानाला आपलेसे केले आहे. हे तंत्रज्ञान सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. देशाच्या विकासामध्ये नोकरशाहीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या नोकरशाहीने काळानुरूप बदल स्वीकारून प्रशासनात नवतंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु केला आहे. आणि म्हणूनच देशातील प्रशासन आता ई-प्रशासन होत आहे. बऱ्याच अंशी यशही प्राप्त झाल आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा राज्यातील पहिला 'ई-ऑफिस जिल्हा' ठरला आहे. महाराष्ट्राची या क्षेत्रातील घोडदौड नेत्रदीपक स्वरुपाची आहे. प्रस्तुत पुस्तकात लोकप्रशासन ते विकास प्रशासन, ई-प्रशासनात नागरिकांची भूमिका, माहिती दळणवळण यंत्रणा आणि राज्यशासनाचे ई-प्रकल्प, भारताचा ई- प्रशासन प्रकल्प, तंत्रज्ञानाचा आविष्कार, महाराष्ट्राची सुप्रशासनाकडील वाटचाल आणि विकसित देशातील ई-प्रशासन या विषयांवर प्रकाश टाकलेला आहे. अशा प्रकारे मराठीतील हे एकमेवाद्वितीय पुस्तक ठरेल. त्याचबरोबर महाराष्ट्र व देशातील प्रशासकांसह नागरिकांनाही हे पुस्तक दिशादर्शकाचे काम करू शकेल.