Summary of the Book
साहित्यशास्त्रातील अनेकविध मुद्द्यांना स्पर्श करत सामाजिक दृष्टीने विवेचन करत माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष दत्ता भगत यांनी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. साहित्यशास्त्राची विविधांगी चर्चा हा या लेखनाचा मुख्य हेतू आहे. वाचकांशी संवाद साधत केलेली साहित्यविषयक चर्चा यातील विविध लेखांमध्ये आहे.
साहित्य समजून घेताना सामान्य वाचकाला पडलेले प्रश्न, हे प्रश्न समजून घेताना होणारा गुंता याविषयी लेखकाने आपल्या लेखांमध्ये सविस्तर मार्गदर्शन केले आहे. वाङ्मयीन आस्वाद आकलन आणि मूल्यमापनातील अडथळे कळावेत या हेतूने हे लेखन करण्यात आले आहे. लेखांमध्ये दिलेल्या छोट्या दाखल्यांमुळे लेख रंजकही झाले असून, प्रबोधनही करतात.