Summary of the Book
शेती करताना मधला दलाल,व्यापारी,वाहतूक इ.बाबी टाळून शेतकर्यांच्या हातात रोख पैसा मिळतो, त्यामुळेच शेकर्यांनी करारशेती आणि कंपनी शेती-संकल्पना समजून घेतांना ग्राहकाची आवड निवड, करार शेतीस प्रोत्साहन देणार्या कंपन्यांची मागणी,त्याप्रमाणेच शेतमाल पिकविणेचे धोरण अंमलात आणावे,सध्या मॉल संस्कृती वेगाने वाढत आहे.उदा.इ.स.२००० मध्ये हिंदुस्थानात फक्त ३ मॉल्स होते.२००५ पर्यंत या देशात २२० मॉल्स उभे राहिले.सुभिक्षाने एकाच दिवशी १०० लहान लहान दुकानांची साखळी सुरु केली.वॉलमार्ट-भारतीने आपल्या देशातील शेतकर्याबरोबर शेतीमाल,भाजीपाला,फळे वगैरेच्या खरेदीसाठी करार करण्याचा सपाटा सुरू केला आहे.जगामध्ये प्रचंड वेगाने वाढणार्या या उद्यागामध्ये हिंदुस्थान हा रिटेलिंग मार्केटमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे.करार शेती करतांना शेतकर्यांनी काय काळजी घ्यावी,तो कसा करावा याचा नमुना लेखकाने पुस्तकात दिला आहे तो निश्चितच मार्गदर्शक आहे.लेखकाने केलेल्या करारशेतीचे अनुभव कथन करून त्याची वास्तवता व धोक्यांची जाणीव करून दिली आहे.म्हणून एकूणात शेतकर्यांना करारशेती आणि कंपनी शेती फायदेशीर कशी पडेल,हे पुस्तक वाचल्यावरच जास्त लक्षात येईल.