Rohit S.
02 Oct 2021 05 30 AM
अध्यात्मिक वाटचालीमध्ये कोणत्याही स्तरावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, कोणताही पंथ, संप्रदाय असणाऱ्या साधकाने, ज्यांना त्यांच्या सद्गुरूंची भेट झाली आहे किंवा ज्यांची सद्गुरूंची भेट होणे बाकी आहे अशा सर्वांनी, थोडक्यात काय तर प्रत्येकानेच हा ग्रंथ वाचावा.
सद्गुरु आणि सत्शिष्य यांचे नाते कसे असते याचे अतिशय आदर्श असे उदाहरण काका महाराजांच्या जीवनातून आपल्याला शिकायला भेटते. सद्गुरु आपल्या शिष्यावर किती प्रचंड प्रेम करतात, परंतु ते प्रेम व्यक्त करण्याची सद्गुरूंची जगावेगळी अशी पद्धत असते, ती आपल्याला हा ग्रंथ वाचल्यानंतर समजण्याची शक्यता वाढते. एक मात्र नक्की की, हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या सद्गुरुंवर आपले प्रेम वृद्धिंगत होईल आणि सद्गुरुंचे महत्त्व देखील आपल्याला समजेल यामध्ये माझ्या मनात कसलाही संशय नाही. हा ग्रंथ वाचत असताना हृदयामध्ये भक्तीचा उदय होऊन अश्रुंवाटे त्याची पावती भेटली नाही असा एकही वाचक माझ्या पाहण्यात नाही.
एकंदरीत प्रत्येकाने हा ग्रंथ आपल्या आयुष्यात एकदा तरी अवश्य वाचावा असा आहे.
जय सद्गुरू...