Summary of the Book
कंपनीच्या प्रशासनाचे जे काम असते तेच प्रशासनाचे असते. फरक एवढाच त्यांची व्याप्ती प्रचंड असते. ज्यांच्यासाठी देशाचे प्रशासन काम करते, ती जनता हीच शासकीय व्यवस्थेत अंतिम असते. जनतेचे प्रश्न, समस्या, विकास, प्रगती यासाठी अनेक निर्णय घेतले जातात. ते कधी योग्य ठरतात, तर कधी आयोग्य. त्यांची अंमलबजावणी हाही महत्वाचा मुद्दा असतो. भारतीय प्रशासन सेवेत काम करण्याची संधी मिळालेल्या लीना मेहेंदळे यांनी जनतेला जवळून पाहिले आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविताना आलेले अनुभव, विविध विषयांची माहिती त्यांनी 'समाजमनातील बिंब'मधून कथन केली आहे. चांगल्या लोकशाही व्यवस्थेसाठी समाजात गतिशीलता व प्रयोगशीलता हवी, यासाठी होत असेलेले प्रयत्न यात दिले आहेत.