Summary of the Book
भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरूंचे पुरोगामी, संवेदनाक्षम आणि द्रष्टे नेतृत्व लाभले म्हणूनच संसदीय लोकशाहीची सुदृढ पायाभरणी होऊ शकली आणि धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था स्थिरावू शकली. या दोन्ही बाबतींतील नेहरूंचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे.
अर्थात काश्मीरचा रेंगाळलेला संघर्ष, चीनबरोबरचा चिघळलेला सीमावाद अशा अनेक समस्यांचे ओझेदेखील त्यांच्या चुकांमुळेच आपल्याला अजूनही वाहावे लागते आहे. तथापि जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला, तर नेहरूंनी दिलेल्या देणग्यांचे पारडे निश्चितच जड आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या उत्तुंग नेतृत्वाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे सिंहावलोकन आहे.