योगेश कुलकर्णी
27/12/2023
जीवनामध्ये सर्वार्थाने अपयशी असलेल्या एका व्यक्तीला एखादी लॉटरी लागावी त्याप्रमाणे त्याला सर्वस्वी अज्ञात असलेल्या एका आजोबांची लाखाची संपत्ती मिळते. त्यानंतर पुढे घडणारी घटनांची भयावाह मालिका वाचकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. दत्तू, सविता, गोडे गुरूजी, जबडे वकील, जखोबा, अशी सगळीच पात्र दस्तांनी मांडलेल्या अघोरी खेळामध्ये सहभागी होतात. अखेर, ज्याला त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. या सर्वांचे चित्तथरारक आणि प्रत्यकारी वर्णन करणारी कादंबरी.