Hard Copy Price:
R 500
/ $
6.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
गीता हा एक संकीर्ण कुंभ आहे , ज्यात ज्ञानरुपी महासागर भरलेला आहे . तरीही लोकमान्य टिळक गीतेचे मर्म ग्रहण करण्यात यशस्वी झाले आणि आपल्या जीवनकार्याव्दारे त्यांनी गीता वाचकांसमोर मांडली . केवळ गीतारहस्य वाचल्यामुळे सर्व शास्त्रग्रंथांचे ज्ञान होते. तत्वज्ञानावरील कोणत्याही ग्रंथाचा विस्तार केल्याशिवाय तो सोपा करून सांगणे जवळजवळ अशक्य असते , सोपेपणा आणि सारांश हे परस्परविरोधी आहेत . बऱ्याचदा सारांश क्लिष्ट , जवळपास अगम्य असतो . लोकमान्यांचे सूक्ष्म आणि सखोल विचार आजच्या भाषेत स्पष्टपणे आणि थोडक्यात मांडणे हे अतिशय अवघड काम आहे. अरुण तिवारी यांच्यामध्ये आधुनिक शिक्षण आणि पारंपारिक , आध्यात्मिक जडणघडण यांचा सुरेख संगम आहे , जो तो त्यांच्या लिखाणातून अचूकपणे प्रकट करतात. ते संवेदनशील आहेत, त्यामुळे त्यांच्या शब्दांमधून अनुकंपा प्रतीत होते. त्यांचे हे काम म्हणजे केवळ पांडित्यपूर्ण लेखन नाही , तर गीतेची भक्तिभावने केलेली पूजा आहे.
ब्रिटिशांच्या राजवटीत पिचलेल्या भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भगवद्गीतेवर आधारित 'गीतारहस्य ' हा एक विस्तृत टीकाग्रंथ लिहिला . या पुस्तकात मूळ ग्रंथाच्या संरचनेला जराही धक्का न लागू देता , हल्लीच्या काळात अनुरूप अशा शैलीत आणि भाषेत लोकमान्य टिळकांचे विचार मांडले आहेत. हिंदू धर्म हा एक चिरंतन धर्म आहे , हे अरुण तिवारी यांनी या पुस्तकाव्दारे उत्तमप्रकारे सिद्ध केले आहे . हिंदू धर्मात अखंड आध्यात्मिक अर्थशोधनाव्दारे 'स्व 'ची नव्याने ओळख घडते आणि सतत बदलणाऱ्या या विश्वातील शाश्वताचा शोध घेण्याचा मार्ग सापडतो . चिंतनाव्दारे स्वत:मध्ये सतत सुधारणा करीत राहणे, हे आपल्या मानसिकतेत , गुणसूत्रांमध्ये गुंफलेले आहे. आपल्या मुक्तीची बीजे आपल्यातच दडलेली असतात.