Summary of the Book
एकोणिसाव्या शतकात ब्रिटीशांची सत्ता भारतावर होती. याच काळात वैचारिक परिवर्तन सुरु झाले होते. काही इंग्रज अधिकाऱ्यांनी शिक्षण व अन्य चांगल्या गोष्टीना सुरवात केली. त्यामध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर एल्फिन्स्टन यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. त्याचप्रमाणे भारतीयांमध्येही विचार सुधारणा होऊ लागली होती. यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. अशा व्यक्तींचे विचार व कार्य याची माहिती गोविंद तळवलकर यांनी 'मंथन' मधून दिली आहे. एल्फिन्स्टन, सर दिनशा वाच्छा, महात्मा फुले, न्या. रानडे, टिळक, आगरकर, गोखले, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार, न्या. रानडे व त्यांच्यातील साम्यस्थळे यांचा विचार यात आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जे नेते उदयाला आले, त्यांचे राजकीय, सामाजिक कार्य यातून पुढे आले आहे.