Summary of the Book
या ग्रंथाचा मुख्यविषय राजनीती हा आहे. यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत. हा ग्रंथ वाचताना प्रथम दर्शनी आपल्या लक्षात येते, ती महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपति संभाजी महाराजांनी प्राचीन ग्रंथांचा केलेला सखोल अभ्यास. त्यांनी या ग्रंथात समाविष्ट केलेल्या श्लोकांची वर्गवारी त्यात आढळणारी त्याची नीरक्षीरविवेकता, त्यांचे मांडण्याचे कौशल्य हे सारे पाहून ऊर दडपून जातो. राजनीतीची शास्त्रीय भूमिका मांडताना छत्रपति संभाजी महाराजांनी अनेक महनीय अशा ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. उदाहरणार्थ महाभारत, मनुस्मृती, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्सपुराण ही सारी छत्रपति संभाजी महाराजांची अध्ययन क्षेत्रे आहेत, हे लक्षात येते. विविध पुराण ग्रंथातून "राजनीती' या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण, श्लोकांना विषयानुरुप अशी शीर्षके, हे काम कुणी महाज्ञानी, बुद्धीयोगीच करु जाणे. या ग्रंथातील वैशिष्ट्ये, विशेषत- राजनीतीसंबंधीचे छत्रपतींच्या ठायी आढळणारी ज्ञानगांभीर्यता महा महा विद्वानांनी वाखाणावी अशी आहे.