Summary of the Book
'कुणालाच नको....राहू देत मलाच!!' अशी खास खरे स्टाइल अर्पणपत्रिका समोर येते आणि
एकामागून एक सुंदर कवितांची माळ आपल्या समोर हेलखावे घेते; मात्र प्रथम जाणवते ती
आकर्षक सजावट, उत्तम निर्मितीमूल्य आणि डोळ्याला सुखद वाटणारी रंगसंगती. संदीप खरे
यांच्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या कवितांचा हा संग्रह. 'खूप बोललो आता एवढंच सांग, डोळ्यातून
लागतो का मनाचा थांग?', 'कितीक हळवे कितीक सुंदर,किती शहाणे अपुले अंतर!', किती
पाहायची वाट वेड लागल्याप्रमाणे? जे न आपुले तयाशी सांग कशाला बोलणे!',
अशा अर्थपूर्ण ओळी हळुवार उलगडतात..