Summary of the Book
सध्याच्या युगात सर्व सुखे उपलब्ध आहेत. मनुष्याची आर्थिक प्रगती झाली तरी त्याचे मानसिक सुख हरवले आहे. जीवनमूल्यांना स्थान नसल्याने माणूस भरकटला आहे. म्हणूनच आज भक्ती, सत्संग याची गरज त्याला वाटत आहे. यासाठी आपल्या संत-महात्म्यांची चरित्रे वाचणे आवश्यक ठरते. शं. वा. मठ यांनी ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत जी संतपरंपरा निर्माण झाली त्यांची महती "वैष्णवांचा मेळा" मधून दिली आहे. संतांची माहिती, कार्य सोप्या भाषेत त्यांनी सांगितले आहे, तसेच त्याला अभंगाचीही जोड दिली आहे.