Summary of the Book
ही कहाणी आहे अशा एका योद्ध्याची... ज्याने मराठेशाहीच्या अस्तकाळात स्वातंत्र्ययुद्धाला नवसंजीवनी दिली.
ही कहाणी आहे अशा एका योद्ध्याची ज्याने झेलली संकटाची वादळे, अंतःकरणात धरली कायम विजयाची आस... ज्याचं सारं आयुष्य व्यापलं होतं युद्धांच्या झंझावातात. अफाट नेतृत्त्व क्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची पराकाष्ठा हे गुण ज्या महायोद्ध्यात होते ते म्हणजे महाराजा यशवंत होळकर.
निबंधमालाकार चिपळूणकरांनी त्यांच्या 'इतिहास' या अत्यंत गाजलेल्या निबंधामध्ये भारतातल्या सर्वात पराक्रमी, नामवंत योद्ध्यांच्या नामावलीत पोरस, शिवाजी, विक्रमादित्य, बाजीराव, रणजितसिंग यांच्या बरोबरीनेच यशवंतराव होळकर यांचेही नाव आदराने घेतले आहे. थोर इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांना यशवंतरावांवर महाकाव्य लिहावेसे वाटले. यातच सारे आले. हिंदूंनी तसेच सर्वांनी एक होऊन इंग्रजांना समुद्राच्या पलीकडे ढकलून द्यावे हा त्यांचा आग्रह होता. ही कहाणी महाराजा यशवंतरावांच्या शौर्याची आणि जाज्ज्वल्य इतिहासाची साक्ष देईल.
अनंत शंकर ओगले लिखित आणि व्यास क्रिएशन्स प्रकाशित मातृभूमीप्रेम मनामनात चेतावणारी अनमोलगाथा !