Summary of the Book
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे.सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही.या सर्वदूर प्रगतीमागील मुलभूत तत्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्त्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत .वारणानगर,अकलूज ,कोल्हापूर ,इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत.सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने नि:संशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे.अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच.सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व कष्टकऱ्याच्या खडतर जीवनमानाला पत व अर्थ प्राप्त करून देणाऱ्या या सहकारी वृटवृक्षाचं बीजारोपण इ.स.१८९७ सालीच,ऐन पारतंत्र्याच्याअंधारयुगातचझालं! त्या वर्षीच भारतातीलच नव्हें, तर अखिल आशियातील सर्वसामान्यांचा पहिला सरकारी साखर कारखाना उठविणारा सहकाराचा सच्चा ,जिद्दी ,क्रियाशील व अपार कष्टाळू उद्गागाता जन्माला आला.कोठे?तर बुद्रुक लोणी या सर्वस्वी आडगावात!कोण ?महाराष्ट्रातगेल्या पिढीत घडून गेलेल्या आर्थिक आघाडीवरच्या एका अटीतटीच्या,चिवट व अंती यशमय झालेल्या 'लढती 'चा हा ललित-समृद्ध मागोवा !वातावरण,बोली-भाषा ,व्यक्तिरेखांकन यांचा शिवाजी सावंत यांनी खास आपल्या शैलीत घेतलेला ह्रद्य असा आपल्या शैलीत घेतलेला ह्रद्य असा एक शोध बोध -