Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
संपादन आणि अनुवाद : निरंजन उजगरे प्रस्तावना : वसंत आबाजी डहाके स्वातंत्र्योत्तर भारतातील निवडक अनुवादित कविता
स्वातंत्र्योत्तर भारतातील निवडक कवितांच्या अनुवादाचा ‘काव्यपर्व’ हा संग्रह मराठी साहित्यक्षेत्रातील एक ऐतिहासिक महत्त्वाची घटना ठरावी अशा योग्यतेचा आहे. सत्तरीच्या दशकात लिहू लागलेले आणि आता मराठीतील एक नामांकित कवी श्री. निरंजन उजगरे यांनी या संग्रहाचे संपादन केलेले आहे आणि या संग्रहातील सर्व कवितांचा अनुवादही त्यांनीच केलेला आहे. या संग्रहात आसामी, इंग्रजी, उडिया, उर्दू, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगु, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मणिपुरी, मल्याळम, मैथिली, राजस्थानी, संस्कृत, सिंधी आणि हिंदी अशा एकवीस भारतीय भाषांतील निवडक कविता आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे ही गोष्ट आवर्जून नोंदवली पाहिजे. श्री. उजगरे यांनी भारतीय कवितेच्या अनुवादाचे महत्त्वाचे कार्य केलेले आहे.
या सर्वच कवींची कविता स्वतंत्र असूनही त्यांना आतून जोडणारे असे काहीएक सूत्र आहे. ते समकालिन वास्तवाचे सूत्र आहे. एकावेळी एका ग्रंथात दोनतीन पिढ्यांतील कवींच्या कविता एकत्रितपणे वाचायला मिळाल्या की या अंत:सूत्राचा बोध होतो. त्यांचे हे अनुवाद कृत्रिम, बोजड किंवा निर्जीव झालेले नाहीत. चांगल्या मराठी कविता वाचण्याचा आनंद या अनुवादित कविता वाचत असताना मिळतो.
पन्नास वर्षांतली भारतीय मानसाचे अंकन असलेला हा संग्रह वाचताना वाचकाला भिन्न भिन्न भारतीय भाषांमधील कवितेची आणखी अधिक जवळून ओळख करून घ्यावी असे वाटते. निरंजन उजगरे यांनी एकहातीच हा सगळा प्रपंच केलेला आहे. यापुढेही त्यांनी निवडक भारतीय कवींच्या निवडक कवितांचे आणखी संग्रह मराठीत आणावेत. त्यायोगे वाचकांची भारतीय कवितेची आणि एकंदर कवितेची जाणही सखोल होईल.