Hard Copy Price:
25% OFF R 170R 128
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांना आपण 'विश्वकवी' म्हणून ओळखतो. पण त्या बरोबरच ते तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, संगीतकार, गीतकार, नाटककार, कादंबरीकार आणि कथाकारही होते.
रवीन्द्रनाथांची कथा ही बंगालच्या मातीतून जन्माला आली. त्यामुळे बंगाली समाज, त्यातील जातीभेद गरीब-श्रीमंत भेद, श्रद्धा-अंधश्रद्धा ढोंगीपणा आणि माणुसकी ह्यांचे दर्शन आपल्याला त्यांच्या कथांतून घडते. रवीन्द्रनाथांच्या कथांचे विषय कोणतेही असोत. तिच्या केंद्रस्थानी असतो. 'माणूस'. जमीनदार, तळागाळातील माणसं, सुशिक्षित-अशिक्षित, नागर-खेडवळ, प्रामाणिक-लबाड, आसक्त-अनासक्त, मत्सरी-शुद्ध, स्वच्छ मनाचे आबालवृद्ध स्त्री पुरूष त्यांचे कथाविश्व व्यापून टाकतात.
माणसाचे मन म्हणजे तळाचा ठाव न लागणारा खोल जलाशय. परंतू एखाद्या निष्णात मानसशास्त्रज्ञाच्या कौशल्याने रवीन्द्रनाथ माणसाच्या मनाचा ठाव घेऊ पाहतात. त्यामुळे सखोलता प्राप्त झालेली त्यांची कथा एक उंची गाठते.
रवीन्द्रनाथांच्या कथा आताच्या काळातही ताज्या वाटतात. ह्याचे कारण ते माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती, भाव-भावना यांना महत्त्व देतात. वाईटावर चांगुलपणाने मात करता येते आणि अशा प्रकारे केलेली मात सर्वांचेच मंगल कसे करते हे ह्या कथा सांगतात.
रवीन्द्रनाथांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या पंधरा अनुपम कथांचा हा संग्रह वाचकांना अननुभून आनंद आणि भावसमृद्धता प्रदान करेल यात शंकाच नाही.