Summary of the Book
महाराष्ट्र गेल्या वर्षी 50 वर्षाचा झाला. त्यानिमित्त महाराष्ट्राच्या वाटचालीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न विविध पातळीवर झाला. तसाच एक प्रयत्न व्यासंगी अभ्यासक दत्ता देसाई यांनी आपल्या "महाराष्ट्राच्या विकासाची दिशा - हवी नवी मळवाट' या पुस्तकाद्वारे केला आहे.
या पुस्तकात दहा प्रकरणात महाराष्ट्राच्या विकासाची दिशा कोणती होती आणि तो आज कोठे येवून पोहचला आहे. याची मार्मिक चिकित्सा केली आहे. "स्वप्न हरवलेला देश' अशी सुरुवात करून विकास म्हणजे काय? महाराष्ट्राला घडवणार्या शक्ती कोणत्या? त्यांची या वाटचालीतील भागीदारी कशी आहे, याचे विवेचनही योग्य केले आहे. कोठे जायचे आहे, हे निश्चित ठरवून वाटचाल करणारा कदाचित महाराष्ट्र हा (एकमेव) प्रांत असावा. त्यासाठीच कृषि औद्योगिकरणाचा मार्ग स्वीकारून सहकारी चळवळ हे माध्यम निवडून वाटचाल केली. सहकारी चळवळीचे विश्लेषणही त्यांनी दोन्ही बाजूने केले आहे.
श्री. दत्ता देसाई यांनी आपल्या पुस्तकातून महाराष्ट्राच्या वाटचालीतील अंतर्विरोध मांडले आहेतच शिवाय कोठे, कोणाचे, काय चुकते याचाही शोध घेतला आहे. जनतेच्या विकासाला केंद्रबिंदू मानून नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी अस्मितेचे किंवा मराठी भाषकाचा उपराष्ट्रवादाचा सिद्धांत उपयोगी पडणार नाही, याची देखील नोंद केली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून कृती करणार्यांना विचार करायला लावणारे पुस्तक आहे.