Summary of the Book
भारतीय साहित्याचा विकास प्राचीन काळापासून अत्यंत गतीने आज पावतो सुरु राहिला आहे. आजकाल संवाद साधने वेगवान पद्धतीने बदलत आहेत. परंतु लिखित साहित्य किंवा श्रुती परंपरेचा विश्वास मात्र जसाच्या तसा आजही पाहायला मिळतो आहे. या संदर्भात संकलक या नात्याने मराठी वाड्मयात काव्य ज्याला अभंग, ओवी अशी विविध नावे दिली गेली तरी त्याला मूळ गाभा कविता हाच असून विशेषतः स्त्रीया मध्ययुगीन काळात शिक्षण प्रक्रियेपासून थोड्याशा दूर राहिल्या असल्या तरी त्यांच्या अनुभूती प्रतिभा या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत परावर्तित होत राहिल्या तशा त्या मातृसंस्थेचा ठेवा म्हणून भारतीयांनी त्यांना परंपरेत, श्रद्धेत विश्वासात गुंतावूनही ठेवले असले तरी त्यांच्या मनाचे मुक्त अविष्कार आपल्याला या संत कवयित्री गृहिणी, आई, बहिण, माऊशी या रूपाने बोधच करत राहिल्या त्या सर्वांचा ठेवा ऋण प्रत्यर्पणाच्या दृष्टीने येथे एकत्र करताना विशेष आनंद होत आहे.