Summary of the Book
शेतकर्याचे जीवन कायम तळ्यात-मळ्यात असते. पाऊस पडेल का, पीक चांगले येईल का, भाव मिळेल का, अशा एक अनेक विवंचना त्याला सतावत असतात. सोलापूर जिल्ह्यासारख्या कायम दुष्काळी भागातील परिस्थिती कठीणच. मात्र तेथील दुष्काळातही शेतकर्यांच्या आकांक्षा फुलविणारे वि. ग. राऊत यांचे कृषी क्षेत्रातील कार्य महत्त्वपूर्ण आहे. कोणतीही शैक्षणिक व कृषी संशोधनाची पार्श्वभूमी नसताना त्यांनी नवे तंत्रज्ञान, कल्पकता, अनुभव याच्या जोरावर सोलापूरच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणला. प्रयोगशील वृत्तीच्या कृषिभूषणाचे चरित्र अरविंद जोशी यांनी ‘दुष्काळाशी दोन हात’मधून सर्वांसमोर आणले आहे. नवनवीन प्रयोग करू पाहणार्या शेतकर्यांना राऊळ यांची जीवनकथा प्रेरणादायी ठरेल.