Summary of the Book
ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी घेऊन त्याचं निरूपण करताना त्यात शेतीविषयक मार्गदर्शन केलं आहे. अध्यात्म्य आणि शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनाची अशी वेगळीच सांगड यात घातलेली आहे. एका पानात एक ओवी. त्याबद्दल निरूपण करताना साधी सोपी भाषा, यामुळे पुस्तक वाचनीय झालं आहे. सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करताना राजेंद्र घोरपडे यांनी शेतकऱ्यांना खूप मोलाच्या टिप्स दिल्या आहेत. घोरपडे यांचं हे तिसरं पुस्तक आहे. काय सांगायचं याचं नेमकं भान घोरपडे यांना असल्यानं, ते इथं शब्दांचा फाफटपसारा न करता अचूक माहिती नेमकेपणानं देतात.