Summary of the Book
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षातही आणले. त्यांनी जात-पंथ, उच्च - नीचता बाळगली नाही. अठरापगड जाती व हिंदुतर धर्मांचे लोक त्यांच्याबरोबर होते. स्वराज्य स्थापनेत त्यांचाही वाटा आहे. उच्च ध्येय पाहताना त्यांनी सामान्य माणसाच्या, विशेषकरून शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी शिवराय जागरूक असत. शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली.
त्यांच्या याच गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला. त्यांचे हे रूप श्रीकांत देशमुख यांनी 'कुळवाडीभूषण शिवराय'यामधून केला आहे. शिवकालीन गावगाडा, कृषी अर्थव्यवस्था, स्वराज्याचे धोरण, गावाचे विस्थापन, पुनर्वसन, दुरुस्ती याविषयीची माहिती यातून मिळते. शिवरायांची आज्ञापत्रे, पत्रे, महात्मा फुले यांच्या मनातील शिवराय, एकविसाव्या शतकातील गावगाडा यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे.