Summary of the Book
जून सुरु झाला की आषाढी वारीचे वेध वारकऱ्यांना लागतात. आळंदी देहू येथील पालखी सोहळ्याच्या तयारीच्या बातम्या येऊ लागतात. वारी म्हणजे काय तर आनंद, उत्साह, चैतन्य, उर्जा असे वर्णन करीत वैष्णवांच्या या सोहळ्याचे वर्णन दीपक नीलकंठ बीचे यांनी 'वारी : एक आनंदसोहळा'मध्ये केले आहे.
पंढरी वारीच्या सांस्कृतिक परंपरेत वारीचा व्यापक अर्थ, महत्व स्पष्ट केले आहे. वारीचा इतिहास व योगदानात वारकऱ्यांची लक्षणे, पंढरी व आळंदीची वारी, वारकरी संप्रदायाचे योगदान, वारकरी आचारधर्म, वारकऱ्यांची ग्रंथसंपदा, वारीचे तात्विक अधिष्ठान, पालखी सोहळ्याचे धार्मिक महत्व, पालखी सोहळ्याचा कार्यक्रम, परदेशी संशोधकांच्या दृष्टीने वारीचे महत्व, वारकऱ्यांची कीर्तन परंपरा याची माहिती लेखकाने दिली आहे.
तसेच वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेला विठ्ठल व पंढरपूरचे महात्म्यही सांगितले आहे.